Thursday 28 February 2019

#FinalStrike



My Mentor Dr. Aniruddha Joshi always keep on saying "Believing God is the act of brave and not of cowards" and there are many such examples in the history. The current actions taken by India against Terrorism reminded me the story of David and Goliath.

What could be the reason why terrorists are more afraid of a tiny country like Israel rather than bigger powers

 How can David's Victory who was just a shepherd boy from israel be an model for us in current situation. Lets have a look:

DAVID AND GOLIATH:

Since last 40 days , Goliath was challenging armies of Israel for one on one fight. However it was a fearful prospect. There is no doubt about it as the Goliath was approximately 9 feet 6 Inches tall, almost twice as tall as any other man in army of Israel. We can easily relate to this situation as our current action against terrorism giant who is challenging us since long time. 

David's story showed us the right way to react when faced with a giant. David was very confident and he was incredulous that anyone would think that they could take on an army led by GOD. We can also relate ourselves as a soldier in the army of the "Living God", these giants have no right to any hold over us.  
   
WHY DAVID WAS SO SORTED:

David was just a young shepherd boy, with no experience of battle and Goliath was a battle- hardened man of war since ages. But that doesn't meant anything to David. WHY? What makes David so confident that he wouldn't listen to the words of doubt from those who tried to dissuade him. Because David believed in the "Living God of Israel", that he could and would save any who battled in his name. David's faith was so strong that he volunteered to go himself and to fight with Goliath. David was so firmed in his thought process that he believes God is powerful than the Evil. 

According to him formidable giant was as nothing to him in comparison with what God able to do. Whenever any evil challenges us the power of God is fully made available to us. Believe in God. We are not alone. We have the "Living God on our side".

#FinalStrike:
David Accepted Goliath's Challenge, he took his staff in one hand, and his sling in the other. Then, with full faith in the "Living God", he stepped forward to face the Goliath. When Goliath saw that David is not a soldier, but jus a boy with no battle gear, Goliath cursed him by his god, but David was determined. The stone David slung at Goliath went straight into his forehead and he fell to the ground. The great giant who had terrorized the army of Israel had died at the hands of an inexperienced youth, because of his faith in the power of God. 

Current Giant For India:

By repeated terrorist attack on us, on our faith and endurance by the terror state Pakistan and it's so called supporter, we used to feel weak, but after going through the above mentioned facts there is no need to feel weak, we should also stand firm like David. The god who ensured the Victory for DAVID, will also do so for us. When we get such living and powerful faith in God (BHAKTIBHAV CHAITANYA) we have all the possibilities to take over all evils/ giants. 

TIME HAS COME FOR #FinalStrike WE TOO CAN BE LIVING EXAMPLES OF WHAT "LIVING GOD" ABLE TO ACCOMPLISH FOR THOSE WHO TRUST HIM. THE MOMENT WE RECKON OURSELVES AS SOLDIER IN THE ARMY OF THE "LIVING GOD", THE BATTLES ARE ALREADY WON.

युद्ध कर्ता श्री राम : मम ,समर्थ दत्तगुरु मूलाधार:
साचार वानर सैनिकोहम, रावण वध: निश्चित:||


Image result for ravana killed by rama


Sunday 12 August 2018

"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" (ज्योतिर्लिंग यात्रा २०१८) भाग: २


दिवस पहिला : २०/०६/२०१८
ठरल्याप्रमाणे मी २० तारखेला सकाळी बरोबर ८ वाजता देहरादून एयरपोर्ट बाहेर पोहचलो. 





तेथून वेळ न दवडता प्रायव्हेट टॅक्सीने ऋषिकेश गाठले. वाटेतच बाईक रेंटल वाल्याशी बोलणे केले. बरोबर ९ च्या सुमारास त्याच्या दुकानासमोर मी उभा ठाकलो. अजून दुकान उघडले नव्हते. बाहेर काही बाईक उभ्या होत्या. मी संभ्रमावस्थेत त्या न्याहाळू लागलो. इतक्यात  मागून मला आवाज आला . "आपने फोन किया था ? जी मेर नाम सुमित गोयल है ।" मी एक बुलेट निवडली. पुढे  सगळे पत्रव्यवहार केल्यानंतर मी पावणे दहाच्या सुमारास सगळे सोपस्कार म्हणजे उदी , लॉकेट आणि ललकारी देऊन केदारनाथच्या दिशेने कूच केली.


आता पर्यंत मी आणि वॉरहॉर्स म्हणजे "दो  जिस्म एक जान ". परंतु नवीन बाईक जरी बुलेट प्रजातीची असली तरी तिची आणि माझी सांगड काही केल्या बसेना. हॅन्डल पोजिशन, सीटिंग पोजिशन मला हवी तशी मिळत नव्हती. त्यात उत्तराखंड म्हणजे वळणावळणाचा रस्ता. पर्यायाने मी वेग हळूच ठेवला. पण मलाच ते रटाळवाणं वाटू लागला.

त्यात पावसाऐवजी उन्हानं कहर केला होता. सारंच अवघडून बसलं होत. ऋषिकेश ते गौरीकुंड जवळपास  २१० किमी चा प्रवास. पहाडी भागातील २१० किमी  म्हणजे जवळपास ६-८ तास लागतात. शिवाय नेहमीचे वाहन नसेल तर अजून पंचाईत होते. मी आजचा प्रवास तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे  ठरिवले. पहिला टप्पा ऋषिकेश ते देवप्रयाग (७४ किमी), देवप्रयाग ते रुद्रप्रयाग  (६७ किमी), रुद्रप्रयाग ते गौरीकुंड (७२ किमी).

मजल दरमजल करत, बाईकशी बैठक जमवून घेत कसा बसा मी देवप्रयाग पर्यंत पोहचलो. अडीच तासात फक्त ७५ किमी चे अंतरच कापू शकलो. पण परिस्थितीचा आढावा घेता टाईमिंग बरा होता. उत्तराखंड मध्ये उन्हाळा जून महिन्यापर्यंत असतो. शाळेला सुट्टी देखील जून महिन्यापर्यंत असते. डोंगराळ भागातील उन्हाळा म्हणजे अक्षरशः हालत खराब. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नवीन बाईक, दर ५० मीटर अंतरावरील वळण, जागोजागी रस्त्याची कामं (चार धाम योजनेअंतर्गत). एव्हाना माझ्या कंबरेत चांगलीच उसण भरल्यागत मला वाटू लागलं.



पुढे एका वळणावर मी स्थिरावलो आणि चहूकडे नजर फिरवली आणि क्षणात सगळा क्षीण बाजूला सारला गेला. देवप्रयाग फारच सुंदर भासत होता. उत्तराखंडमधील आता पर्यंतच्या प्रवासातील सर्वात सुखावह टप्पा होता. 





प्रयाग  म्हणजे  प्र (निरंतर) + याग (यज्ञ ) ज्या  ठिकाणी  निरंतर यज्ञ कार्य चालते. म्हणजेच पुराण काळात या क्षेत्रांचे फार महत्त्व असणार यात शंकाच नाही. भारतात असे चौदा प्रयाग आहेत. प्रत्येक प्रयाग पवित्र नद्यांच्या संगमाशी संबंधित आहेत. त्यापैकी ५ प्रयाग उत्तराखंड मध्येच आहेत.
१) रुद्रप्रयाग – अलकनंदा – मंदाकिनी संगम
२) कर्णप्रयाग – पिंडरगंगा – अलकनंदा संगम
३) देवप्रयाग – अलकनंदा – भागीरथी  संगम
४) नन्दप्रयाग – अलकनंदा – नंदा संगम
५) विष्णुप्रयाग – विष्णुगंगा – अलकनंदा संगम
यापैकी माझ्या प्रवासात मला देवप्रयाग, नंद प्रयाग आणि विष्णुप्रयाग यांचे दर्शन घेता आले. आता मला फारच हुरूप आला होता. मी मनात आकडेमोड केली आणि लक्षात आले की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ५ वाजे पर्यंत गौरीकुंडला पोहचलंच पाहिजे. आता कमीत कमी दोन तास तरी सतत गाडी रेटायला हवी या निर्धाराने मी निघालो. तासा भरात मी श्रीनगरला पोहचलो. वाटेत फळांचे रस विकणारी दुकाने दिसली. एवढ्या उन्हात जेवावसं वाटत नव्हतं म्हणून आज फक्त ज्युसच प्यायचा मी ठरविले. एक थंडगार बनाना मिल्क शेक यथेच्छ हाणला आणि पुढच्या रस्त्याला निघालो.  


वाटेत धरी देवीचे मंदिर लागले. त्याचे बाहेरूनच दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.



 अवघ्या एक तासात मी रुद्रप्रयागला पोहचलो. तिथे पुढची चौकशी केल्यानंतर मी केदारनाथच्या दिशेने निघालो. जवळ पास पावणे तीन वाजले होते आणि त्यापुढे फक्त ७२ किमी. नागमोडी रस्त्याचा आता पर्यंतचा प्रवास मी वेळेत पूर्ण करत होतो याचं मनोमन समाधान मिळत होते.आताचा टप्पा प्रवासातील कठीण परंतु आल्हाददायक होता कारण आता मी पर्वतराजी चढायला सुरुवात करीत होतो. 

घाट वळणांचा रस्ता चढत चढत मी हळूहळू अंतर कापत होतो. एव्हाना माझ्या नकळत एक गोष्ट घडली होती. ती म्हणजे माझी आणि माझ्या बाईकची आता चांगलीच गट्टी जमली. आम्हा दोघांना एकमेकांची नाडी योग्यरीत्या सापडली होती. त्यामुळे प्रवास अजूनच सुखकारक वाटत होता. शिवाय उकाड्यातून सुटका देखील झाली.

केदारनाथच्या दिशेने जाणारे प्रत्येक पाऊल सुखकारक होते यात शंकाच नाही. थोड्याच वेळात मी फाटा या ठिकाणी पोहचलो. येथून पुढे गौरीकुंडपर्यंत वेगवेगळी हेलिकॉप्टर्स ऑपेरेटर्सची उड्डाणस्थळे सुरु होतात. आईला केदारनाथला फार वर्षांपासून जायचे आहे पण कामाच्या रगाड्यात तिला ते जमलेच नाही. आता साठी ओलांडल्यानंतर तर ते जवळ पास अशक्यच अशी तिची समजूत बसलेकारणाने तिने त्याचा ध्यास सोडला. आईसाठी म्हणून मी  सहजच चौकशी करण्याकरीता माझी बाईक पवनहंस नामक सरकारी ऑपरेटर्सच्या ऑफिसच्या आवारात घुसविली. बरीच लोकं आगाऊ बुकिंग करून ठेवतात आणि त्यामुळे ऐनवेळेला सीट मिळत नाही याची पूर्व कल्पना मला होती. तिथली माहिती गोळा करून मी गौरीकुंडला निघणार इतक्यात तिथं उभ्या असलेल्या दोन ग्रुपची तारांबळ मला दिसली. गोंधळ न बघता पुढे जाईल तो मुंबईकर कुठला? मी या नियमाला बगल तरी कशी देणार? मी त्या ग्रुपच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. त्यागोंधळात एक ईश्वरी योजना होती. त्या हेलिकॉप्टर्स ऑपरेटर्सच्या नियमांनुसार फक्त चार प्रवाशी जाणार होते आणि शिवाय त्याला वजनाची मर्यादा होती.  त्यामुळे एक ग्रुप जाऊ शकत नव्हता. मी तिथल्या अधिकाऱ्याला सहज विचारले "क्या प्रॉब्लेम है? इक जगह है क्या?" मौके पे चौका मारावा तसा माझा प्रश्न होता त्या अधिकाऱ्यासाठी. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे एक वेळ पाहिले. मला वजन करायला सांगितले. आणि म्हणाला "ठीक है आप पैसा भर दो ।"  मी पुरता गोंधळून गेलो. क्षणाचाही विलंब आणि विचार ना करता मी पैसे भरले बोर्डिंग पास मिळवला आणि पुढच्या बॅच सोबत हेलिपॅडच्या दिशेने निघालो.




माझा विश्वासच बसत नव्हता, उद्याचा अक्खा संपूर्ण दिवस वाचणार होता. मी विचार काय केला होता आणि घडत काय होतं. २००० रोजी बापूंशी माझा परिचय होण्यापूर्वी माझ्या जीवनाचे प्लॅनिंग काहीतरी भलतेच होतं. म्हणजे माझ्यामते, माझ्या कुवतीनुसार आणि मला हवे होते असे. पण जेव्हा मी बापूंशी मैत्री केली त्यानंतर त्याच्या सोबत राहिल्यावर हळू हळू लक्षात आले की ज्या गोष्टींचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता अशा सुंदर सुंदर गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या. जीवनाचे सोनं होणं म्हणजे काय, ह्याचं उत्तम उदाहरण मी आजवर स्वतः अनुभवत आहे. आणि बापूंच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाची कहाणी काही वेगळी नसणार यात शंका अजिबात नको.
आजची हेलिकॉप्टर्स राईड हे त्यातील एक उदाहरण. ह्याचा एकच अर्थ होता की जो एक दिवस वाचणार होता त्यामुळे नुसतं केदारनाथ नाही तर ऋषिकेश आणि हरिद्वार देखील अनुभवायला मिळणार होतं आणि याचा खूप खूप आनंद होत होता. जीवनात पहिल्यांदा मी हेलिकॉप्टर्समध्ये बसत होतो. फारच विलक्षण वाटत होते. लहान बाळाला अलगद कडेवर उचलून घेऊन आई ज्या हळुवारपणे आई निघते अगदी त्याच प्रकारे त्या हेलिकॉप्टर्सने केदारनाथच्या दिशेने उड्डाण घेतले. 


 उंचावरून केदारनाथचा रस्ता दिसत होता. फारच सोप्प वाटत होतं, जेव्हा की अनेक जणांनी केदारनाथविषयीचे आपआपले कटू अनुभवच माझ्या पदरी बांधले होते. पण त्या सर्वांच्या अनुभवाविपरीत माझा अनुभव फारच आल्हाददायक, बिन परिश्रमाचा आणि परमोच्च आनंद देणार ठरत होता. अवघ्या आठ मिनिटात आमचे हेलिकॉप्टर्स केदारनाथच्या हेलिपॅडजवळ उतरले. त्यावेळी तर मला तिथल्या लोकांसोबत फेर धरून नाचावेसे वाटत होते.




मुंबईहून निघून अजून फक्त १७ तासच झाले होते आणि मी केदारनाथच्या समोर उभा होतो. माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. काय करू आणि काय नको असे झाले होते. तेथील सारा आसमंत नजरेने हृदयात स्थिर करण्याचा माझा प्रयत्न चालू झाला. केदारनाथ मंदिरासमोर उभे राहून पहिले असता असे लक्षात येते की मागची शुभ्र बर्फ़ाच्छादित पर्वतराजी जणू प्रभावळच आणि जेव्हा उगवतीच्या सूर्याची कोवळी उन्हे यावर पडतात तेव्हा सोनेरी छटांनी ती प्रभावळ फारच सुंदर दिसते.हवामान खात्याने दिलेल्या धोक्याच्या सूचनेमुळे तिथे जास्त गर्दी नव्हती. जवळपास ८० ते १०० मंडळी तिथे दिसत होती. केदारनाथचे दर्शन घेण्यापूर्वी मी जवळच्या टेकडीवरील भैरवनाथ मंदिराकडे निघालो. केदारनाथ मंदिराच्या उजव्या बाजूने जवळच असलेल्या टेकडीवर भैरवनाथाचे मंदिर आहे. जेमतेम १ किमी. भैरवनाथ केदारनाथ क्षेत्राचे रक्षणकर्ते आहेत अशी भावना आहे. हिवाळ्यात जेव्हा बर्फवृष्टीमुळे केदारनाथ मंदिराचे कपाट बंद होते तेव्हा या क्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी भरीवनाथांची असते. म्हणूनच त्यांना क्षेत्रपाल देखील म्हटले जाते. उंचावर असलेल्या या मंदिरातून सर्व परिसर फारच नयनरम्य दिसतो.
तेथील दर्शन घेऊन मी लागलीच खाली उतरलो. केदारनाथाचे दर्शन घेतले. इतक्यात आरतीला सुरुवात झाली. 


एव्हाना रात्रीचे पावणे आठ झाले होते. अचानक वातावरणातील थंडीने आपला जोर वाढविला आणि माझ्या लक्षात आले की  मी अजून राहण्याची काहीच व्यवस्था केलेली नाही. आरती संपल्यानंतर मी दोन-तीन हॉटेल व्यवसायिकांना विचारले असता त्यांनी नकारार्थी माना हलवून माझी पंचाईत केली. २०१६ च्या डिसेंबर महिन्यात मी ओंढा ग्राम स्थित "नागनाथ" या ज्योतिर्लिंगाला भेट दिली होती. सुट्टीच्या काळ आणि फारच कमी हॉटेल्स असल्याने मला ती रात्र एक हॉटेलच्या पार्किंग लॉट मध्ये काढावी लागली होती, त्यावेळची थंडी कशीबशी मी पचविली होती. पण इथे रात्र बाहेर काढली असती तर मात्र माझी काही धडगत नाही यात शंकाच नव्हती. केदारनाथच्या पाठीमागील भागात असलेल्या बर्फाच्छादित डोंगररांगांमुळे सूर्य मावळल्यानंतर तर थंडीचे तांडव सुरु झाले होते. त्यात वाऱ्याचा वेग देखील वाढत होता आणि माझी चिंतादेखील जवळपास बाहेरच रात्र घालवावी लागणार असे वाटत होते.
सगळी चिंता बाजूला सारून मी जेवण करून घ्यायचे ठरविले. चौकशीअंती लक्षात आले कि जवळपास सर्वच धाब्यांवर सारखेच मेनू आहेत. त्या शोधकार्यात एक पुजारी भेटले, त्यांनी मला पूजा करणार का? असा प्रश्न विचारला. मी माझ्या जागेच्या विवंचनेत आणि ते त्यांच्या दक्षिणेच्या. मी विचारले "रहने को जगह मिलेगी ?" कितने आदमी हो ? मैं अकेला हूँ । या संभाषणाअंती मला एक रुम मिळवून देण्यात ते पुजारी यशस्वी झाले. जेवताना ते माझ्या सोबतच होते. इतक्या लांबून येऊन, इतकी मेहनत, खर्च करून तुम्ही इथे येत आणि नुसतेच दर्शन घेता. त्याऐवजी तुम्ही पूजा करा असा तगादा त्यांनी माझ्या पाठीशी लावला होता. त्यावर मी त्यांना म्हटले, पूजा कोणाला करावीशी वाटत नाही, परंतु बऱ्याच ठिकाणी जे अवडंबर चालते आणि पैसे उकळण्याचे धंदे असतात त्याची भीती वाटते अजून काही नाही. त्यावर त्यांनी मला निर्वाणीचे सांगितले का कोणास ठाऊक पण मला असं वाटत आहे की तुम्ही पूजा केलीच पाहिजे, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला फक्त एकच रुपया द्या दक्षिणेचा आणि पूजेचे साहित्य तुम्ही घ्या. जर तुमच्याकडे एक रुपया नसेल तर जेव्हा तुम्ही मुंबईला पोहचाल तेव्हा माझ्या बँकेतील खात्यात तो एक रुपया जमा करा, पण तुम्ही पूजा केल्याशिवाय जायचे नाही. मी अवाक झालो होतो. अक्षरशः चेकमेट. मी व्याव्हारिकपणे विचारले. सामानाचे किती? त्यावर तुमची इच्छा, १५०/ २५०/ ५०० अशी निरनिराळी साधन सामुग्री आहे. मी त्यांना १५० वाली साधन सामुग्री घेऊन येण्याकरिता सुचविले. त्यावर ते म्हणाले की  ती इथल्या दुकानातुन तुम्ही स्वतःच घ्या. हे सर्व माझ्या डोक्यावरून जात होते. फक्त एक रुपयाचं काय वेड लागलं या पुजाऱ्याला.
सकाळी पाच वाजता मंदिराजवळ भेटू असे ठरले. तसेही मी लवकर उठून पुन्हा दर्शनासाठी मंदिरात जाणारच होतो त्यात झालंच तर पूजाही  होईल. पण  हा काही एक रुपयासाठी उद्या येणार नाही ही  माझी पक्की खात्री करून मी झोपी गेलो.  सकाळी लवकरच चार वाजता उठून सर्व तयारी करून मी हॉटेलच्या बाहेर पडलो आणि मंदिराजवळ आलो. कालचे पुजारी आपल्या विशिष्ट पोशाखात माझी वाटच बघत होते. मी पूजन सामुग्री घेतली आणि
त्यांच्यासोबत मंदिरात प्रवेश केला. केदारनाथ ज्योतिर्लिंगाभोवती पूजेसाठी आलेल्या भाविकांची तोबा गर्दी  होती. त्या पुजाऱ्यांनी अत्यंत कसोशीने मला जयंतिर्लिंगासमोर बसण्याकरीता जागा मिळवून दिली. काय सांगू तुम्हाला आजू बाजूच्या गर्दीची तम ना बाळगता तब्ब्ल १५ मिनिटं निवांतपणे  पंचोपचार पूजा केली. त्या पुजाऱ्यांनी मंत्रोच्चाराला सुरुवात केली  त्या मंत्रोच्चारात लिंगाला पाणी, दूध, तूप, मध आणि चंदन लेपण्याचा अनुभव भारी होता. तदनंतर जानवं ,बिल्वपत्र, फुले वाहिली. पूजे दरम्यान अनेकदा लिंगाला मस्तकाचा स्पर्श केला. एकदम जबरदस्त अनुभव होता तो. त्या दरम्यान कोणीच मला माझ्या जागेवरून लवकर उठा किंवा पूजा आटपा वगैरे व्यत्यय आणला नाही. सर्वच काहीतरी विलक्षण होतं ते.
पूजेनंतर मी समाधानानं मंदिराबाहेर पडलो. आनंदाने मी त्या पुजाऱ्याच्या हातात पाचशे एक रुपये ठेवले. हॉटेलवर येऊन सर्व आवरले. चहा आणि बिस्किटं खाऊन मी बरोबर ६ वाजता मी हेलिकॉप्टरच्या बेसपाशी पोहचलो.
आता माझ्यापुढे पुढचा प्रश्न होता तो म्हणजे खाली कसे जायचे. जर मी ट्रेक करून खाली गेलो तर  कमीत कमी ५ ते सहा तास लागणार म्हणजे जवळपास दुपारी १२ ते १ च्य दरम्यान मी गौरीकुंडाजवळ पोहचणार. तिथून पुढे फाटा येथील पवनहंस या हेलिकॉप्टर्सच्या ऑफिस आवरात ठेवलेली बाईक घेऊन रुद्रप्रयागला जाऊन रात्र घालवायची की पुन्हा हेलिकॉप्टर्सने थेट पवनहंसचे ऑफिस गाठायचे आणि विनासायास पुढे २०० किमी वर असलेल्या बद्रीनाथचे दर्शन घ्यायचे. सरासरी विचार करता मी दुसरा पर्याय निवडायचे ठरविले. पण तेथील कुठल्याच हेलिकॉप्टर्स ऑपरेटर मला सकारात्मक भूमिकेत दिसत नव्हता. कारण एकच उतरताना अनेक भक्त अनेक कारणांपोटी हेलिकॉप्टर्सचा पर्याय निवडतात. आणि अशावेळी माझ्यासारख्या आगंतुक आणि ऐनवेळी हजर होणाऱ्या प्रवाशाची गणती थिजगणतीतच होते.

त्याचवेळी कालचे तीन प्रवासी पावनहंसच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. पुन्हा पहिले पाढे पंधरा. तोच वजनाचा घोळ आणि मग त्यांनीच गळ घातली की मला देखील त्यांच्यासोबत घेण्यात यावे. पुन्हा एकदा माझा नंबर लागला.  परंतु तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शक्य असल्यास तुम्ही आगाऊ बुकिंग करून जा आणि त्यात येण्या जाण्याचे केले तर अति उत्तम. आमचा नंबर येईपर्यंत जवळपास सकाळचे ७.१५ वाजले. ८ च्या आसपास मी पुन्हा सज्ज होऊन बद्रीनाथच्या दिशेने निघालो. २०० किमी चा टप्पा आणि बराच वेळ हाताशी असले कारणाने मी वाटेत लागणारे चोपटा, तुंगनाथ या ठिकाणी जाण्याचे देखील ठरविले.

पुढच्या लेखात तुंगनाथ, बद्रीनाथ आणि माना गाव (Last Indian Village) बद्दल  माहिती आणि अनुभव.......

Saturday 4 August 2018

"जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" (ज्योतिर्लिंग यात्रा २०१८) भाग: १


देहरादूनच्या जॉली ग्रॅण्टच्या एअरपोर्टवर अनाउंसमेंट झाली, मुंबईला जाणारे विमान एक तास उशिराने उडेल. मग काय तिथल्या वेटिंग लॉबीमध्ये बसल्या जागीच स्थिर झालो. पण मग मनाचे काय ते कुठं स्थिर बसणार होते. आपसूक मागील एक महिन्यात झालेल्या घडामोडींच्या उजळणीला सुरुवात झाली. कधीही न होणारी माझी केदारनाथ बाईक यात्रा संपूर्ण झाली शिवाय नुसतंच केदारनाथ नाही तर, तुंगनाथ, बद्रीनाथ, माना गाव, सरस्वती नदी, व्यास गुफा, अनेक महत्त्वाचे प्रयाग, हरिद्वार, ऋषिकेश, गंगा इतकी सगळी क्षेत्र आणि चोपटा, जोशी मठ सारखी प्रेक्षणीय स्थळं फक्त पाच दिवसात कशी काय मी पूर्ण करू शकलो यावर अनेकजणांचा आजही विश्वास बसत नाही. मुंबई- उत्तराखंड- मुंबई आणि वर नमूद केलेल्या सर्व पवित्र क्षेत्र केवळ पाच दिवस? कसं काय केलंस रे बाबा? तुझे पाय कुठे आहेत रे बाबा ? तुला घरच्यांची पर्वा नाही काय रे ? घरचेतरी कसे पाठवतात रे तुला ? त्यांची पण कमाल आहे रे ? अनेक जणांचे अनेक प्रश्न. कुणाचे काळजी पोटी, तर कुणाचे कुतूहलापोटी, कुणाचे मत्सरापोटी तर कुणाचे कुचक्यास्वभावापोटी .......

पण खरंच सांगू मित्रानों, माझे एकच सूत्र ...... ।।एक विश्वास असावा पुरता कर्ता, हर्ता गुरु ऐसा ।। 
माझे सद्गुरू, माझे मित्र, माझे बापू म्हणजेच आमचे लाडके डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी,


केवळ त्यांनी दिलेल्या सामर्थ्याच्या बळावर आजवर बाईकने भारतभर प्रवास केला तो देखील रेकॉर्ड टाइममध्ये. मी करत असलेल्या बाईक राईड यशस्वी होण्यामागे फक्त आणि फक्त त्यांचाच हात आहे. सुंदरकांडाचे एक वाक्य मी माझ्या मनावर कायम कोरले आहे "सो सब तव प्रताप रघुराई नाथ न कछु मोरी प्रभुताई " . माझ्या लेखात या आधी आणि या पुढे जर कुठेही माझा अहं येत असेल तर तो बापूंच्या चरणी विलीन व्हावा ही एकच अपेक्षा.

वॉरहॉर्सवर आरूढ होण्याअगोदर स्वतःला आणि त्याला चांगल्या प्रकारे उदी लावतो. अगदी टायर, केबल्स , बॅटरी,आरसे, इंजिन , इंडिकेटर्स , लाईट, चैन काही काही म्हणून सोडत नाही, त्रिपुरारी चिन्हाचे आणि  त्रिविक्रमाचे लॉकेट स्वतःला आणि वॉरहॉर्सला देखील. आणि मग काय दोघेही गडी तय्यार एका नव्या कामगिरीसाठी. 

बुलेटची किक म्हणजे बंद पडलेल्या हृदयाला देखील कंपने आणते, निदान जुन्या बुलेटच्या बाबतीत तरी ते अगदी खरं आहे. माझी तरी जुनीच आहे म्हणजे उलट्या बाजूला गिअर्स असणारी. जुन्या बुलेट बाळगणारे ज्या आवेशात किक मारतात त्याची गंमत भारी असते.


ज्याप्रमाणे आपल्या लाडक्या राजाच्या  नावाचा जयघोष करताना शंखनाद, तुतारीचे दीर्घ स्वर, नगाऱ्यांचा नादध्वनी संपूर्ण नसानसांतून रक्ताचा प्रवाह उसळवतो अगदी तशीच अवस्था माझी होते जेव्हा मी किक मारताना बापूंच्या नावाचा जयघोष करतो. आणि त्याच आवेशात एखाद्या योध्याप्रमाणें मग मी माझी बाईक राईडची कामगिरी पार पाडतो.       


आजवर कन्याकुमारी ते काश्मीर खोऱ्यातील उंच सखल भागातून बाईकने प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली, प्रवासात कधी कार्पेट घातल्यासारखे मोठं मोठे नॅशनल हायवे व त्यातील मोठमोठया वाहनांच्या धोकादायक वेगवान हालचाली सामोऱ्या येतात, कधी वाळवंटी प्रदेशातून दूर-दूर पर्यंत एक चिटपाखरू देखील न दिसणारा वैराण रस्ता, कधी किर्रर्र जंगलातून जाणारा भयावह रस्ता, तर कधी बर्फ़ाच्छादित प्रदेशातून जाणारा, थंडीने मेंदूच्या पार ठिकऱ्या उडविणारा रस्ता, कधी कधी अचानक मोठयाला प्रवाहाने वाहून गेलेला रस्ता, तर कधी कधी अर्धा रस्ताच नाही अशात आपले उचित ध्येय नजरेसमोर दिसतं पण मार्गच दिसत नाही मग पुढं जाणार कसं? या उलट मनाला सुखावणाऱ्या निसर्गरम्य प्रदेशातून जाणारा सुंदर, सुव्यवस्थित रस्ता देखील अनुभवयाला मिळला. हे सर्व जीवनापेक्षा वेगळं असू शकेल का? गेली पाच वर्षे करत असलेल्या बाईक प्रवासात एक मोलाची गोष्ट मला कळली ती म्हणजे नित्य जाणीव "तो सदैव माझ्यासोबत होता,आहे आणि असणार." आणि आपसूक मन, बुद्धी आणि देह एका अभंगात गढून जातं ....

                     जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
                       चालविसी हाती धरूनिया ।।१।।
                    चालो वाटे आम्ही तुझाचि आधार ।
                      चालविसी भार सवे माझा ।।२।।
                    बोलो जातां बरळ करिसी ते नीट ।
                     नेली लाज धीट केलों देवा ।।३।।
                     अवघे जन मज झाले लोकपाळ ।
                        सोईरे सकळ प्राणसखे ।।४।।
                    तुका म्हणे आतां  खेळतों कौतुके ।
                      जालें तुझें सुख अंतर्बाही ।।५।।

बाईकवर असताना ही जाणीव आम्हा तिघांना ही आहे. तिघे म्हणजे मी, वॉरहॉर्स आणि माझी पत्नी वर्षा आणि म्हणूनच आम्ही तिघेही नेहमीच निश्चिन्त असतो. 

उत्तराखण्ड बाईकने पालथा घालण्याचे वारे जवळपास दोन तीन वर्षे माझ्या डोक्यात घुमत होते. कारण ही तसेच खास. केदारनाथ. यापूर्वी नऊ जोतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे भाग्य माझ्या पदरी पडले. त्यातील ८ जोतिर्लिंग मी आणि माझी बुलेट (वॉरहॉर्स) दोघांनी एकत्र केलीत. मी माझ्या बाईक राईडचे सूत्रच बदलून टाकले. दरवर्षी निदान एकतरी जोतिर्लिंग बाईकने पूर्ण करायचे. आणि २०१८ हे वर्ष मी केदारनाथ चे दर्शन घेण्याचे ठरविले. यावेळी सोबत माझा मित्र अमित चॅटर्जी देखील तयार झाला. ऑफिसमधील कामाचा आवाका लक्षात घेता, मुंबईहून केदारनाथला बाईकने पोहचणे शक्य नव्हते. म्हणून आम्ही हरिद्वार पर्यंत ट्रेन आणि मग पुढे बाईकने प्रवास असा निश्चय केला. यावेळी आम्ही आमच्या बाईक न घेता ऋषिकेश येथून भाड्याने बाईक घेणार होतो. तशी सगळी माहिती देखील गोळा केली.

ठरल्याप्रमाणे ९ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आखला. त्या अनुशंघाने येण्या जाण्याच्या प्रवासाचे तिकीट देखील आम्ही बुक केले. परंतु त्यात अमितने आणि अप्रत्यक्षरीत्या त्याच्या घरच्या मंडळींनी एक अट टाकली ती म्हणजे या राईड मध्ये केदारनाथ नाही करायचे. आता माझी कोंडी झाली मला कोणत्याही परिस्थितीत केदारनाथ करायचे होते आणि अमितला कोणत्याही परिस्थितीत ते करायचे नव्हते. मनोमन मी माघार घेतली आणि काळजावर दगड ठेवून, अमितच्या हिशोबाने नुसतं प्रेक्षणीय स्थळं फिरण्याचा मानस नक्की केला. आमच्या प्रवासाचा महिना उजाडला. जून . जूनच्या १५ तारखेला आम्ही निघणार होतो आणि २४ जूनला परतीचा प्रवास होता. दिवस एका मागोमाग उलटू लागले. दरवेळी प्रमाणे यावेळी माझी उत्कंठा शिगेला पोहचु इच्छित नव्हती कारण मी केदारनाथला जाणार नव्हतो.  
  
अशातच ९ जूनला सकाळी सहा वाजता दारावरची कडी वाजली . सुट्टीच्या दिवशी इतक्या सकाळी म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार. मी त्वरेने दार उघडले तर समोर आमच्या माळ्यावरचे, ८२ वर्षांचे कोल्हटकर काका. मी विचारायच्या आधीच ते गंभीर आवाजात म्हणाले, अत्रे काका गेलेत. मी लागलीच अत्रे काकांच्या घरात पोहचलो. एकलुत्या एक मुलीचे लग्न झाल्यानंतर, अत्रे दांपत्य एकटेच राहत होते. दोघेही नुकतेच साठी पार करून आरामात आयुष्य जगत होते. ३५ वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झालेला. दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम. घरात त्यावेळेला अत्रे काका शांत पणे बेडवर झोपलेल्या अवस्थेत तर त्यांच्या शेजारी अत्रे काकु बसल्या होत्या त्यांना मी हाक मारताच त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि धाय मोकलून रडू लागल्या. आमच्याच इमारतीत मी याच अत्रे काकूंसमोर लहानाचा मोठा झालो, अनेक हाल अपेष्टांचे ओझे वाहताना आजवर मी त्यांना पाहिले होते. पण रडताना मी त्यांना गेल्या ३५ वर्षात पहिल्यांदा पाहत होतो. मी काकूंना धीर दिला. दुपारपर्यंत आम्ही इमारतीतील सर्वजण अत्रे काकांना घेऊन स्मशान भूमीत पोहचलो. अत्रे काकांच्या घरच्या लोकांनी सोपस्कार करण्यास सुरुवात केली आणि मी तेथून बाहेर पडून तिथल्याच एका बागेत जाऊन शांत पणे अत्रे काकांसोबत बालपणापासून घालविलेल्या गोष्टींना उजाळा देत बसलो. काकांसोबत घालविलेले अनेक क्षण मला बेचैन करू लागले. काकांचा मिश्किल स्वभाव वारंवार नजरेसमोर तरळू लागला. त्या सर्व गोष्टींनी बेजार होऊन मी आभाळाकडे बघितले आणि माझी नजर पडली तो त्या बागेतील कारंज्यावर विराजमान शिवाच्या मूर्तीवर. अर्धोन्मीलित नजरेची ती धान्यस्थ मूर्ती किती शांत, स्थिर आणि स्थितप्रज्ञ भासत होती. क्षणात मनातल काहूर शांत झालं आणि अगदी त्या क्षणाला मनातून एक आवाज आला. "केदारनाथला जायचं म्हणजे जायचं".

मी ठरविले, सोमवारी ऑफिसमध्ये पोहचल्या पोहचल्या अमितला सांगणार "मी केदारनाथला जाणार म्हणजे जाणार". सोमवारी कामाच्या रगाड्यात मी ती गोष्ट विसरून गेलो. आमचा प्रवास त्या आठवड्यातच सुरु होणार होता. आता त्यात  सोमवार देखील गेला, म्हणजे फक्त ३ दिवस अगोदर प्लॅन चेंज झाल्याचे अमितला कळवायचे प्रश्नचिन्ह माझ्यापुढे होते. मी देवालाच साकडं घातल "बाबा रे तूच काय तो मार्ग दाखव " दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला माझ्या डेस्कवर पोहचण्याआधीच अमित तिथं माझी वाट पाहत बसला होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलू लागला. "अरे भाई तुझे कुछ पत्ता है की नही? उत्तराखंड मे क्लाउड बर्स्ट हुआ है, बहुत प्रॉब्लम चालू है, अपने को कॅन्सल करना पडेगा । " मी मनातल्या मनात भगवंताचे आभार मानले. सुंठेवाचून खोकला गेला. मला काहीच बोलावे लागले नाही. आता मी फक्त केदारनाथ करण्याच्या हेतूने मनात प्लॅन करू लागलो. त्याने त्याचे जाण्या येण्याचे तिकीट रद्द केले आणि मी फक्त जाण्याचे रद्द करून १५ तारखे ऐवजी २० तारखेचे तिकीट बुक केले.

एकूण प्रवासाचे दिवस ९ वरून ५ वर आलेत. त्यात २० तारखेला ह्रिषीकेश ला पोहचून बाईक भाड्याने घेणे, मग पुढे गौरीकुंड पर्यंत प्रवास करून त्या रात्री तिथेच मुक्काम करायचा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १४ किमी चा केदारनाथ ट्रेक करायचा केदारनाथचे दर्शन घ्यायचे आणि तिथेच मुक्काम करायचा. तिसऱ्या दिवशी पुन्हा १४ किमी चा प्रवास करायचा आणि गौरीकुंडला मुक्काम करायचा. चौथ्या दिवशी ह्रिषीकेशला पोहचायचे आणि पाचव्या दिवशी देहरादून एयरपोर्टवरून मुंबई साठी विमान. असा पाच दिवसाचा सुटसुटीत कार्यक्रम आखला. यात आकस्मिक आपत्कालीन घडामोडींसाठी पर्यायी दिवसाची काहीच तरतूद नव्हती. विषेशतः उत्तराखंडमध्ये आपत्कालीन गोष्टी काही नवीन नाहीत.

पुढच्या भागात मी नेमक्या प्रवासाला आणि त्यात आलेले अनुभव आपल्यासमोर मांडीन ......

STAY TUNED.........

Tuesday 10 July 2018

ज्योतिर्लिंग बाईक यात्रा २०१७ -२


गतः ब्लॉगपोस्ट के माध्यमसे मैंने आपके सामने नर्मदास्थित ओंकारेश्वर और ममलेश्वर ज्योतिर्लिंग की प्रस्तुति की थी।  इस पोस्ट में आइए देखते है मेरा अगला सफर भगवान महाकालेश्वर जी का। सुबह का दर्शन और नर्मदा तट पर बिछाया हर एक पल मन में समाए वहाँ से निकलना काफी कठीन हो बैठा था।  मात्र भगवान महाकालेश्वर जी के दर्शन की आस मुझे वहाँ से निकलने की अनुमती देने मे सक्रीय हो बैठी।  ओंकारेश्वर और महाकालेश्वर का फासला केवल १३९ किमी का है।  यानी ज्यादा से ज्यादा घंटो का बाइक सफर। 
ओंकारेश्वरसे निकलते ही कुछ दुरी पर मोरटक्का के पहले खेतों के बीचसे गुजरता हुआ रास्ता है।  यहाँ पर फोटो लेने की मेरी इच्छा ने अपना पहला स्टॉप कायम किया।  



१० एक मिनीट तक वहाँ समय बिताने के बाद मैं निकल पड़ा। मैं थोडासा अस्वस्थ महसूस करने लगा था ,हेलमेट के अंदर एक नुकीली चींज मेरे सर पर तीक्ष्ण वार कर रही थी।  बाइक रोकने की मुझे बिलकुल मनीषा नहीं थी। इसलिए बार बार मैं अपने हेलमेट को ठीक कर रहा था। पर मेरा प्रयास व्यर्थ था। आगे बड़वाह मोड़ पर मैंने अपनी बाइक रोक दी हेलमेट उतार कर मैंने अंदर एक विशेष प्रजाति की मक्खी को पाया।  जब मैं खेतों के यहाँ फोटो खिंचवा रहा था शायद उसी वक्त यह मक्खी अंदर घुस गयी होगी। 



इस वक्त मुझे मेरे जीवन मार्गदर्शक गुरु डॉ अनिरुद्धजी के बातों का सुमिरन हुआ।  जब हम भगवान् से मिलने निकलते है , तब मन में अनेक प्र्श्न,किन्तु लिए निकलते है।  यह प्रश्न / किन्तु भगवान् की ओर का हमारा सफर मुश्किल कैसे हो इसी बात का काम करते है।  जिस तरह उस मक्खी के कारण मैं अपने बाइक राइड का आनंद नही ले पा रहा था उसी तरह यह प्रश्न/ किन्तु हमें अपने भक्ति यात्रा का आनंद लेने में अवरोध करते है। 

पर क्या कारण था उस मक्खी के मेरे हेलमेट में आने का ? स्वाभाविकतः से जब मैंने महाकालेश्वर जी के ओर बढ़ने के बजाय अपना ध्यान रास्ते में आनेवाली मनलुभावन चीजों में लगाया, उसी वक्त मैंने अपने लक्ष्य से मुँह मोड़ लिया और अपना सफरभी मुश्किल कर दिया। जिस तरह सफर के एक मोड़ पर मैंने हेलमेट निकाल कर उस मक्खी को ढूंढ निकला, उसी तरह जीवन के एक मोड़ पर जरुरत होती मन / बुद्धि में पैदा होने वाले प्रश्न / किन्तुओं को खोजने कि और उन्हें दूर करने की।  और आगे अब अपना मन कही भी भटकने की दृढ़ इच्छाशक्ति की।  इस के आगे अब मेरा अगला पड़ाव सीधा महाकालेश्वर में ही होगा यह बात थान कर में वहाँ से निकल पड़ा। 

तक़रीबन बजह तक मैं उज्जैन स्थित महाकेलश्वरजी के मंदिर पहुँच गया था।  

तुरंत ही एक होटल में रूम बुक करवाके में मंदिर परिसर घूमने निकल पड़ा।  भीड़ को देख मैंने शाम को आराम से दर्शन लेने का विचार पक्का किया।  वहाँ पर एक काउंटर पर  थोडीसी भीड़ देखी। पूछताछ करने पर पता चला की वह तो भस्मारती की लाइन है।  सिर्फ कुछ नंबर ही बाकी थे। मैंने अपने आराध्य, मेरे सद्गुरु श्री अनिरुद्धजी को मन से गुहार लगाईं।  केवल आधे घंटे के अवधि में मेरे हाट में भस्मारती की पर्ची देख मेरा अपने आप पर विश्वास ही नहीं हो रहा था।  



आज तक भस्मारती के बारे में केवल सुना था और आज उसका अनुभव मिलने की ख़ुशी को शब्दोंमें बंद करना मुश्किल है। 

भस्मारती के सामन जैसे की धोती , पानी का कलश इत्यादि की सुविधा होटल मालिक ने पूरी कर दी थी। भस्मारती के लिए रात १२ बजह से लाइन लगती है।  कल दूसरे दिन वापिस मुझे मुंबई की और निकलना था। अगर अब विश्राम ले लूंगा तो अन्य मंदिरोंका दर्शन नहीं हो पाएगा। इसलिए उज्जैनस्थित अन्य मंदिरोंका दर्शन लेने मैं निकल पड़ा। कुछ - घंटो में मैंने मंगलनाथ मंदिर , श्री कालभैरवजी का मंदिर और महर्षि सांदीपनीजी के आश्रम का दर्शन लिया।  स्वयं भगवानने  भी पृथ्वी पर आने के बाद बिना गुरु के जीवन  नहीं बिताया।  इस बात की पुष्टि सांदीपनि आश्रम में जाने के बाद होती है।



मध्यप्रदेश के खाने की विशेषतः इंदौर - उज्जैन की बातों का जिक्र हमेशा सुना था।  आज उसका आस्वाद लेने का समय था।  उज्जैन मालवा रीजन में आता है और यहाँ के खाने की अपने आप में एक विशेषतः है।  इसलिए मैंने मालवा की बहार नाम थाली को पसंद करना जरुरी समझा।  बहुतही रोचक और मजेदार खाना मैंने खाया।  


तत्पश्चात जलेबी और बादाम दूध का आनंद अविस्मरणीय था।




थोडासा आराम कर देर रात, मैं भस्मारती के लिए निकल पड़ा।  


मेरे आगे पुना में कार्यरत अविषेक देसरकार जी से मेरा परिचय हो गया। पूना में एक आईटी कंपनी में काम करने वाले युवक का ज्योतिर्लिंगों के प्रति का ग्यान और आस्था देखते बनती है।  समवयस्क होने के कारण जल्द ही हमारी दोस्ती हो गयी। 


धीरे धीरे रात आगे बढ़ रही थी और हमारी बाते भी , इन बातों दरमियान मेरी गर्भगृह में पहुँचने की मनीषा अधिक तीव्र होने लगी।  शुरवाती दौर मे मैं वक्त कैसे कटेगा इस चिंता से व्यथित था।  परंतु लाईन में मिले भविकोंकी बातोंमे वक्त का अंदाजा ही नहीं लगा।  


थोडीही देर में हमें गर्भगृह मे जल चढाने हेतु आगे बढ़ने का इशारा हुआ। उस वक्त मैं महकालजी पर जलाभिषेक कर रहा था पर सच कहता हूँ दोस्तों  वक्त में शिवजी के प्यार से पूरा भीग चूका था। 

वहाँ से आगे महकालजी के सामने बने हॉल में जाने की सुविधा थी।   सभी भक्तगण वही डेरा जमाये बैठ रहे थे। थोड़ेही देर में महकालजी की भस्मारती शुरू हो गयी।  यह भस्मारती मंत्रमुग्ध करने वाली हैं।  मन ही मन मैंने अपने गुरु श्री अनिरुद्धजी का सुमिरन चालू किया। आज उनके आशीर्वाद के कारण ही मैं यहाँ सब अनुभव कर पा रहा था। 


उसी वक्त  मेरे सद्गुरु पृरस्कृत भजन क्लास मे सीखा हुआ एक भजन मन ही  मन चालू हो गया



गुरु बिन कौन बतावे बाट बड़ा विकिट यम घाट
भ्रान्ति की पहाड़ी, नदिया बीच में अहंकार की लाट
बड़ा विकिट यम घाट

काम क्रोध दो पर्वत ठाड़े, लोभ चोर संघात
बड़ा विकिट यम घाट
मद मक्षर का मेधा बरसत माया पवन बह जाए
बड़ा विकिट यम घाट
कहत कबीर सुनो भाई साधो, क्यों तरना यह घाट
बड़ा विकिट यम घाट  


जीवन मे गुरु का महत्त्व बहुत ही बड़ा है और केवल मेरे गुरु श्री अनिरुद्धजी के आशीर्वाद से ही मैं पुरे भारतभर अकेले ही बाइक से यात्रा कर पाता हूँ।  नाही केवल बाइक यात्रा परंतु भस्मारती जैसे पावन अनुभव को पाना भी उनकी ही योजना है, इस बात पर मेरा पूरा विश्वास है।  आज तक मैंने जिस जिस राह पर निकल पड़ा हूँ , मेरे भगवान , मेरे गुरु , मेरे दोस्त , मेरे पिता मेरे प्यारे अनिरुद्ध हमेशा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष रूप से मेरे साथ चलते है।  और इसी कारण अनेक बिकट समय , कठिन परिस्थियोंसे में हमेशा सही सलामत आगे बढ़ता हूँ।  और यही मेरा विश्वास मुझे अपना जीवन आनंद से जीने का अवसर देता है।